Definition List

LightBlog
Viral Gawali

Thursday, August 2, 2018

कोल्हापूर जिल्हा


            🏙 कोल्हापूर जिल्हा 🏙


      महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे.

📜 इतिहास

      राज्याचे मुख्य असलेले कोल्हापूर शहर प्राचीन शहर आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या तीरावर वसले आहे, तिला 'दक्षिणकाशी' असे म्हणून संबोधले जाते. श्री महालक्ष्मी देवीच्या छात्रछायेमध्ये कोल्हापूर शहर वसले आहे, जिची पद्यपुराणात ख्याती आहे. कोल्हापूरमध्ये सिलहरस, यादव, राष्ट्रकुट व चालुक्य वंशाचे लोक राहत होते.

      सुधारीत पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याची वाढ झाली. सुधारीत शहराचे शोधक व वास्तुविशारद म्हणुन छत्रपती शाहु महाराजांची ख्याती आहे. हा जिल्हा नैसर्गिक स्त्रोतांपासून समृध्द  आहे, उदा:- पाणी, जमीन, नैसर्गिक पद्धतीचा भाजीपाला, प्राणी संग्रहालय ई. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतामध्ये कोल्हापूर जिल्हा हा शेतीतील विकसीत जिल्हा आहे. हा औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगाने पुढे येत असलेला तसेच शेती ऊद्योगामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. भारतामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर जिल्हा आहे. म्हणजेच संशय नाही हा जिल्हा, मिळकतीच्या बाबतीत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये देखील अग्रेसर आहे.

      सांस्कृतीक क्षेत्रामध्ये सुधारीत ईतिहास असलेला कोल्हापूर जिल्हा आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात ऊत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्ती देखील ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. कोल्हापूर जिल्हा हा कोल्हापूर खास बाबतीत प्रसिध्द जिल्हा आहे.

🌨 हवामान

      पश्चिमेकडील घाटामुळे जिल्ह्यातील वातावरण सौम्य व थंड असते. पूर्वेकडील भागात कोरडे वातावरण दर्शवते आणि त्याच्यामुळे येथे मे - एप्रिल महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडक ऊन्हाळा जाणवतो. सागरातील लहरींमुळे जिल्ह्यातील वातावरण बहुतेक थंड असते. कोल्हापूर जिल्ह्याला दक्षिण - पूर्व वार्‍यामुळे पाऊसाची ऊपलब्धता होते, मे - एप्रिल महिन्यात हा पाऊस थंड ढगांमुळे होतो. पावसाळी हंगाम हा जुन ते ऑक्टोंबर महिन्यापर्यंत असतो. पश्चिमेकडील घाटात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि सरासरी 5000 मी.मी पर्जन्यवृष्टी गगनबावडा येथे होते, त्यामुळे ह्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते. शिरोळ व हातकणंगले तालुक्यात कमी म्हणजे सरासरी 500 मी.मी एवढी पर्जन्यवृष्टी होते.

🌿 जंगल

      जिल्ह्यातील एकुण जंगल क्षेत्र 1672 स्क्वे.मी. आहे त्यातील 563 स्क्वे.मी. क्षेत्र जंगलासाठी राखीव आहे व 417 स्क्वे.मी. क्षेत्र संरक्षित जंगलाचा भाग आहे. जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रापैकी 22 % क्षेत्र जंगलांनी व्यापलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जंगलाचे तीन प्रकार आहेत.

1) ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंध यांच्यामधील सदाहरीत वृक्षांचा भाग.

2) दमट वातावरणातील पानेझडीत व कमी सदाहरीत वृक्ष.

3) कोरड्या वातावरणातील पानेझडीत जंगल.

      ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंधीत जंगलांमध्ये जांबुळ, हिरडा, अंजन, सुरंगी, फणस ई. महत्त्वाची झाडे आढळतात. कारवी, ब्राचीन व ईतर वनस्पतींनी हे मैदान व्यापले आहे. आपल्याला मध्यम सदाहरीत व दमट वातावरणामधील जंगलामध्ये आंबा, नाना, सिसम, आसाना, कुंभी, भवा, किंजल, ऐन, किन्नई, अंबर, बिबा, आणि ईतर वनस्पती आढळतात. कोरड्या वातावरणामधील जंगलांमध्ये वरील वनस्पतींमधील काही वनस्पती आढळतात. ह्या जंगलांचे राखीव व संरक्षित जंगलांमध्ये वर्गीकरण केलेले आहे, आणि ह्या प्रात्त्यक्षिकांची प्रतिकृती ‘कुमारी’ मध्ये करण्यात आली आ…

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers